हां रस्ता असाच पुढे जातो.
तुटलेली देवले
फुटलेल्या मशीदी
दुतार्फा जलालेला तस्कट
अन भेगाललेली माती तुडवत.
ह्या रस्त्यावर उरले आहेत आता
चिरेबंदी वाडयांचे भग्नावशेष
फुटलेली वेस अन
अपूरया वासनांचे क्लेष.
रस्त्यावरून जाताना येतो
ओल्या रक्ताचा ओला वास
अन जागो जगी दिसत रहाते
मोडलेल्या माणसांची उंच रास.
रस्त्यावर आता
गिधाडाही घेरावत नाहीत,
कोल्ह्याची टोली दूरच
कुत्री सुधा ओरडत नाहीत.
ह्या रस्त्यावर कोण्या एकेकाली
नांदत होती सुवर्ण नगरी
आगागाडीचे रूळ रुपेरी,
रस्ते होते चार पदरी.
नगरी मधे नांदत होते
मानुसकीचे अमोल नाते
अन दुखान्शी भांडत होते
लाहान मोठे मिळून सारे.
आला कोठून तूफ़ान वारा
घेवून पाउस सवेत गारा
केला मारा अथक तयाने
वाहून गेला गावाच सारा.
रातोराती गायब झाले
चिरेबंदी दगडी वाडे,
वाहून नेले सेव तयाने
उंच पालने पांगुलागाड़े.
उरला मागे चिखलच सारा
काढिता थकला गावच सारा
गलूँ पडले प्रयत्न त्यांचे
भग्न मनोरथ उरला सारा.
निघून गेले मग ते सारे
जे जे वाचले महापूरातून
कधी न आले परतून कोणी
दूर दूरच्या त्या शहरांतून.
पडल्या झाडल्या ह्या गावातून
आता कोणी पथिक न येतो
तुटलेल्या अथावानी घेवून
हां रस्ता असाच पुढे जातो.
-अमित श्री. खरे
No comments:
Post a Comment