Wednesday 5 March 2014

जत्रेच्या दिवशी

जत्रेच्या दिवशी

अरे बाप रे केवढी ही जत्रा,
वीतेवरून उतरताना विठू म्हणाला.
प्रचंड मोठी रांग,
हज़ारो कलपाम्च्या झुंडी,
प्रत्येकाच्या हातात भगवा झेंडा,
तरी सगलेच मारता आहेत मुसंडी!
चन्द्री तर दिसेनाशीच झाली,
आणि रुक्मिनीही रुसून गेली,
आज अठरा युग झाली,
तरी जात्रा संपत नाही,
येतात, राहतात, खातात, पीतात,
पण साफ कुणीच होत नाहीत.
मी मात्र असा वीटेवर थकलो,
पण माणूस कसा थकत नाही,
अव्याहत मागत राहतो फ़क्त,
कष्ट मात्र करत नाही.
काय सांगू, कसं सांगू,
काही-काही कळत नाही,
शेवाटीही सगळ इथेच साचत,
काहीच टाकता येत नाही!
म्हणालो , "बाबांनो येवू नका,
आषाढी कार्तिकी करू नका,
ते करून काहीच होत नाही, आणि केला नाहीत,
तर मी काही पलून जात नाही!"
नंतर चूक लक्षात आल्यावर,
मीच म्हणालो येत जा,
नाहीतर आषाढी कार्तीकीसोदूनही,
कधीतरी दर्शन देत जा!
दोन महीने सोडले,
तर कुणी कुणी येत नाही,
मागण्या पूर्ण झाल्या,
की ओळख सुधा देत नाही.
परत एकदा वीटेवर चढून,
आणि कमरेवर हात ठेवून,
जेव्हा तो पहातो,
तेव्हा परत सज्जा होतो,
अठरा युगांचा 
कंटाला झेलायला.

- अमित श्री. खरे 

No comments:

Post a Comment